मुख्य सामग्रीवर वगळा

भेट

भेट...

#Yks

  ती शेवटची संध्याकाळ तिच्या सवेत घालवायची मला संधी मिळत होती. ती होती , मी होतो , आणि समोर खळखळ करणारा तो समुद्र. खुप काही मला बोलायचं होतं, आणि खुप काही तिला मला सांगायच होतं. शब्दांची सुरूवात कुठुन करावी तेच कळेना. इतर वेळी अविरत बोलणारी ती आज शांत होती. तुझ्या सवे सर्व आयुष्य मला जगायचंय अस म्हणारी ती आज मधुनच सगळं सोडुन चालली होती. कित्येक आठवणी माझ्या मनात कोरुन ती आज शांत होती. शेवटी मीच बोललो, 'माझी आठवण येईल ना तुला ? '  तेव्हा ती एकटक माझ्या डोळ्यात पहात होती. डोळ्यातुन अश्रुंचा थेंब ओघळुन माझ्या ह्दयात तिचा ओलावा करत होती. '
  माझं लग्न दुसर्‍या कोणाशी व्हावं अस मला कधीच वाटतं नव्हतं, तुझ्या आयुष्यात माझं सुख आणि दुखः होतं. पण परिस्थिती आज वेगळी आहे. मी माझ्या आई बाबांना नाही दुखावु शकत.!'  ती अगदी शांत सगळं बोलुन गेली. सगळ्याच्या सुखासाठी तिनं आपल्या प्रेमाचा बळी द्यावा. याचंच मला राहुन राहुन आश्चर्य वाटतं होतं. आई बाबांचा एवढा विचार करणारी ती आज मला शेवटची भेटायला आली होती. पण, माझ्या मनाचं काय? तु माझा विचार का करत नाहीस ? माझ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती मला हे माहित होतं. कोणत्याच बोलण्याने माझं समाधान होणारं नाही हेही तिला माहीत होतं. पण या निर्णयाने ती कोलमडून गेली होती. माझा हात हातात घेऊन ती मला सगळ विसरुन जा म्हणतं होती. मी तिच्याकडे फक्त बघत होतो.
  अखेर सुर्यास्त व्हायची वेळ जवळ आली होती. तिची नेहमीची लगबग आजही तशीच दिसत होती. घरी आई वाट बघत असेल अस म्हणुन ती निघणार होती. मी आता तिला पुन्हा कधी भेटशील अस विचारणार तेवढ्यात तीच म्हणाली' आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न पडतात,  आपल हे प्रेम स्वप्नच होतं अस समज!!! जाते मी !! काळजी घे!!!'
   ती जायला निघाली,  आपल्या प्रेमाला खळखळ करणार्‍या समुद्राचा ऊरात बुडवून ती चालली होती. पाठमोरी तिला जाताना कित्येक वेळ मी पहात होतो. ती संध्याकाळ त्या दिवशी दोन सुर्यास्त पहात होती.  एक सुर्य पुन्हा नवीन सकाळ घेऊन येणार होता, पण मनाचा सुर्यास्त कायमचाच झाला होता. पुन्हा नव्याने सुरूवात करायला तु हवी होतीस अस मला तिला सांगायचं होतं. पाठमोरी जाणार्‍या तिला थांब म्हणायचं होतं. पण, तिला अजुन यामुळे त्रास होणार होता... ती भेट अखेर खुप काही हिसकावून घेऊन चालली होती .. मी मात्र .. खळखळ करणार्‍या लाटांचा आवाज ऐकत अगदी एकटाच बसलो होतो.. त्या लाटांच्या आवाजात तिचा आवाज शोधत....
@योगेश खजानदार

#योगेश_खजानदार

#मी_आणि_माझी_कविता

Yogeshkhajandar.blogspot.com

Yogeshkhajandar.wordpress.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...