हरवलेले पत्र

हरवलेल्या पत्रास आता
कोणी पत्ता सांगेन का
खुप काही लिहलंय मनातल
आता कोणी वाचेन का

काळाच्या धुळीत मिसळुन
सगळं काही संपलय का
शोधुनही सापडेना काही
वाट मी चुकतोय का

जड आहे भावनिक ओझे
कोणी हलके करतेय का
अश्रूंचा ही एक थेंब मला
आज पुन्हा रडवतोय का

पुसट झाली शब्द सारी
आठवण आज तशीच का
जीर्ण झाले पत्र सारे
वाट कोणी पाहतेय का

हरवलेल्या पत्रास आता
कोणी पत्ता सांगेन का

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...