उठावं

अस्तित्वाच्या जाणिवेने
लाचार जगन का पत्कराव
स्वाभिमानाने ही तेव्हा
स्वतःही का मरावं
नसेल त्यास होकार मनाचा
मग शांत का बसावं
निर्दयी या दुनियेत
दया मागुन का रहावं
झुगारून द्याव अन्यायाला
ते ओझं किती पेलावं
नसेल लक्ष विधात्याचं
मग कोणाला सांगावं
की पेटुन द्यावं हे सगळं
क्षणात सगळं राख करावं
वाईट विचारांच्या ताकदीला
क्षणात धुळीत मिळवावं
संपवुन त्या लाचार आठवणी
पुन्हा मनसोक्त जगावं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...