अस्तित्वाच्या जाणिवेने
लाचार जगन का पत्कराव
स्वाभिमानाने ही तेव्हा
स्वतःही का मरावं
नसेल त्यास होकार मनाचा
मग शांत का बसावं
निर्दयी या दुनियेत
दया मागुन का रहावं
झुगारून द्याव अन्यायाला
ते ओझं किती पेलावं
नसेल लक्ष विधात्याचं
मग कोणाला सांगावं
की पेटुन द्यावं हे सगळं
क्षणात सगळं राख करावं
वाईट विचारांच्या ताकदीला
क्षणात धुळीत मिळवावं
संपवुन त्या लाचार आठवणी
पुन्हा मनसोक्त जगावं...
"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply