मनातील वादळ

"वादळाने बोलावं एकदा
त्या उद्वस्त घराशी
मोडुन पडलेल्या
त्या मोडक्या छपराशी

ती वेदना कळावी
एक जखम मनाशी
का बनविले ते घर
ही भिंत काळजाची

जोपासली ती नाती
तुटावी फांदी जशी
कोसळले ते वृंदावन
आपल्याच कोणापाशी

काय राहिले जे गमावले
हा हिशोब स्वतःशी
तुला लागलं तर नाही ना रे?
हा प्रश्न वादळाशी... "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...