मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला || Beautiful Marathi Poem ||

ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !! रोजच्या आठवणींत!!  गिरवायच होत तुला !! हळूच अलगद गुलाबी थंडीत, बोलायचं होतं तुला !! तुझ्या नकारातही अलगद तेव्हा, हसू बघायचं होतं मला !! ऐक ना !! नव्याने भेटायचं होत तुला !! पुन्हा त्या वाटेवर, हरवून जायचं होत तुला !! कधी नकळत तेव्हा , माझ्यात शोधायचं होत तुला !! वळवणावरती वळताना,  अश्रू लपवायचे होते मला !! ऐक ना !! पुन्हा भांडायच होत तुला !! कळत नकळत रुसल्यावर, मनवायच होत तुला !! गालावरच्या रंगास तेव्हा , आरशात दाखवायचं होत तुला !! सारं काही विसरून तेंव्हा , मिठीत घ्यायच होत मला !! ऐक ना !! पुन्हा नव्याने पहायचं होतं तुला !! नकळत त्या नजरेत, कैद करायच होत तुला ! पापण्यात त्या , जपायच होत तुला !! चोरुन त्या नजरेस, बोलायचं होत मला !! ऐक ना !! पुन्हा वचन द्यायचं होत तुला !! प्रत्येक श्वास तेंव्हा, बोलत असेल जेव्हा तुला !!  आयुष्याचे क्षण जेवढे, सारे देऊन टाकायचे होते तुला !! आणि मिठीत येताना तू, अशीच सोबत हवी होती मला !!! ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !!! पुन्हा रोजच्याच आठवणींत, गिरवायच होत तुला !! ✍️ योगेश खजानदार

नभी चंद्र तो || Chandr Marathi Kavita ||

नभी चंद्र तो चांदण्यासवे, उगाच आतुर आहे !! शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे!! कधी पुसावे वाऱ्यासही, तुझीच आठवण आहे!! कधी निखळत्या ताऱ्यातही, तुलाच मागणे आहे !! डोकावूनी त्या खिडकीतूनी , तुलाच पाहणे आहे !! नकळत मग तू दिसताच, अलगद लाजणे आहे!! सांग कशी ही रात्र जणू, मलाच बोलत आहे !! तुझ्याचसाठी गुणगुणावे , जणू गीत गात आहे !! थांबल्या त्या क्षणासही , तुझीच ओढ आहे !! मिठीत घेण्या तुला जणु, ती झुळूक येत आहे !! मनातल्या आठवांचा, अंत कुठे आहे ?? हा भास की आभास जणु, सारेच अधुरे आहे !! नभी चंद्र तो चांदण्यासवे , उगाच आतुर आहे !! शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे !! ✍️ योगेश *ALL RIGHTS RESERVED*

सुरुवात || Manatle Vichar || Marathi Blog ||

 खुप दिवस असे निघून गेले पण मी काही लिहिलंच नाही. शब्दांच्या दुनियेत मी आलोच नाही. शब्दांच मला बोलणं चालूच होत पण मी त्यांना कागदावर लिहिलंच नाही. क्षणभर राहिले मनात आणि निघून गेले !! काही शब्द रुसून गेले. आपल्या हृदयाच्या आणि विचारांच्या मध्ये उगाच कुठे हरवून गेले. ते शब्द असेच मनात राहून गेले. पण मग कुठेतरी एकटेपणाची जाणीव मला होऊ लागली या शब्दांची सोबत किती गरजेची आहे ही गोष्ट मला त्यावेळी कळाली. त्या अलगद मनातून कागदावर येणाऱ्या कविता कुठेतरी मला पुन्हा पुन्हा बोलू लागल्या आणि पुन्हा लिहावं असं वाटू लागलं. पण ते सगळं भावनिक होत सगळं काही त्या शब्दांशी असलेल्या प्रेमासाठी होत. असच कुठेतरी वाटू लागलं. मग त्यात अजून काहीतरी राहतेय ही भावना मला का येत असावी हेच मला कळत नव्हतं. पण शब्दांशी जास्त वेळ लांब नाही राहू शकणार हे ही कळून चुकलं होत. पण मग ती कोणती सल होती मनात की मला माझ्या शब्दापासून दूर करत होती. तेव्हा मी खूप शोधलं आणि कुठेतरी अनोळखी चेहरे माझ्या डोळ्यासमोरून गेले. कदाचित आजचे अनोळखी पण पूर्वीचे ओळखीचे !! मनाच मनाशी भांडण सुरू झालं. त्या शब्दाचा काय दोष ज्यांनी तुला कायम...