टीप :" द्वंद्व " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथा भाग १ प्रिय पायल, प्रत्येक क्षणात जेव्हा आपण आपल्या माणसाला शोधायला लागतो ना तेव्हा त्याचं नसण मनाला खूप वेदना देत. आज पुरती दोन वर्ष झाली तुला माझ्यापासून दूर जाऊन पण तरीही तू परत येत नाहीस. तुला कित्येक वेळा पत्र लिहिली मी, पण एकाही पत्राच तू साधं उत्तरही दिलं नाहीस. पण तरीही मी हा पत्र प्रपंच करत राहीन. अगदी शेवट पर्यंत!! माझ्या विना एक क्षणही न राहू शकणारी तू आज दोन वर्ष माझ्या शिवाय राहते आहेस.तुला माझी एकदाही आठवण आली नाही?? सांग ना ?? एकदा ही नाही !! पण माझे प्रत्येक क्षण तुझी आठवण काढल्या शिवाय राहत नाहीत. कधी कधी वाटतं सगळं हे सोडून द्यावं आणि तुझ्याकडे यावं, एक दोन वेळा प्रयत्न केलाही मी, पण आईच्या वचनात मी गुंतून गेलो. कारण तू पुन्हा नक्की येणार याचा तिलाही तेवढाच विश्वास आहे. पण आता माझ्या आठवांचा बांध फुटेन...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!