मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

द्वंद्व || कथा भाग १ || मराठी प्रेम कथा ||

टीप :" द्वंद्व  " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.  कथा भाग १ प्रिय पायल,  प्रत्येक क्षणात जेव्हा आपण आपल्या माणसाला शोधायला लागतो ना तेव्हा त्याचं नसण मनाला खूप वेदना देत. आज पुरती दोन वर्ष झाली तुला माझ्यापासून दूर जाऊन पण तरीही तू परत येत नाहीस. तुला कित्येक वेळा पत्र लिहिली मी, पण एकाही पत्राच तू साधं उत्तरही दिलं नाहीस. पण तरीही मी हा पत्र प्रपंच करत राहीन. अगदी शेवट पर्यंत!!  माझ्या विना एक क्षणही न राहू शकणारी तू आज दोन वर्ष माझ्या शिवाय राहते आहेस.तुला माझी एकदाही आठवण आली नाही?? सांग ना ?? एकदा ही नाही !! पण माझे प्रत्येक क्षण तुझी आठवण काढल्या शिवाय राहत नाहीत. कधी कधी वाटतं सगळं हे सोडून द्यावं आणि तुझ्याकडे यावं, एक दोन वेळा प्रयत्न केलाही मी, पण आईच्या वचनात मी गुंतून गेलो. कारण तू पुन्हा नक्की येणार याचा तिलाही तेवढाच विश्वास आहे. पण आता माझ्या आठवांचा बांध फुटेन...

एक आठवण ती || विरह मराठी कविता ||

विसरून जावी , पण ओठांवर आहे !! पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!! एक आठवण ती, तुझी सोबत आहे !! तुझ्या असण्याची, जाणीव एक आहे !! सांगावी तुला ती, पण निशब्द मी आहे !! तुझ्या सोबतीची, उगा ओढ आहे !! भेटावी कधी अचानक, मना वाटतं आहे!! परी आभास का , आज होत आहे !! साऱ्या चांदण्यात आज, तूला शोधले आहे!! पण ती चांदणी एक, कुठे हरवली आहे ? चंद्र तो त्याविन, अधुरा भासतो आहे!! चांदणे ते पौर्णिमेचे, तुला बोलते आहे !! पहावी ती सांज, झुळूक एक आहे !! बोलते ते ती काही, मन हे ऐकते आहे!! हात हातात घेऊनी, वचन देत आहे !! आयुष्यभराची सोबत, एवढेच मागणे आहे !! नजरेत भरुनी घ्यावे, तुझेच चित्र आहे !! अश्रू हे ओघळता, नजरेस हरकत आहे !! समजवावे कोणास , हाच प्रश्न आहे!! मन हे अल्लड, मी अधीर आहे !! सारी पाने पहावी, तुझेच नाव आहे!! कवितेत त्या लिहिताना, भाव तूच आहे !! शब्दांच्या पलीकडे पाहता, गाव तेच आहे !! जिथे तुझे नी माझे , घर एक आहे !!! एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!! ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

जिथे मी उरावे || अबोल प्रेम कविता || Poem ||

जिथे मी उरावे ! तिथे तू असावे !! जिथे मी पहावे !! तिथे तू दिसावे !! कधी न कळावे!! नजरेतूनी पहावे !! लपवून मी ठेवता!! तुला ते कळावे !! सांग या मना रे !! सांगते का तुला रे !! गाणे या ओठांवरी!!  गाते का सख्या रे !! ओढ ती कोणती!! तुला न जानवावे!! माझ्यात मला मी!! तुझ्यात का शोधावे !! प्रेम असे का?? नकळत आज व्हावे !! सांगावे परी तुला!! ओठांवरी का रहावे !! अशी एक मी!! एक तु आज व्हावे!! तुझ्यात मी गुंतता, परी एकच रहावे !! आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !! चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !! एक ती वाट!! श्वास एकच व्हावे !! हात हातात तुझ्या!! आयुष्य मी जगावे !! ✍️योगेश *ALL RIGHTS RESERVED*

मराठी उखाणे || नव्या नवरिचे उखाणे || Marathi ukhane ||

नव्या नवरिचे उखाणे .. १. संसार रुपी वेलीला, झाली आता सुरुवात !!     ... रावांचे नाव घेते, सुखाच्या या क्षणात !! २. नव्या वाटेवरती चालताना, हात देते हाती      ..... रावांच्या सोबतीने, संसार होईल सुखी !! ३. सात पाऊले, सात फेरे , साता जन्माची साथ जणू !!      ..... रावांच्या सोबत असेन, झाडा सोबत सावली जणू !! ४. साक्ष त्या देवाब्रांह्मणांची, साक्ष आहे त्या अग्नीची !!     .... रावांच्या साथीने , साक्षी होईन सुखी संसाराची !! ५. माप ओलांडून येताच, मिळाली कित्येक नवी नाती !!     ... रावांच्या सोबत, बहरून येतील ही नातीगोती !!! ६. आईची माया, बाबांचे विचार , एवढीच शिदोरी आणली सोबत !!      येईल उन्ह नी वारा ,पाऊस नी वादळ, नेहमीच राहील ... रावा सोबत !! ७. साथ असेल , हाती हात असेल , एवढा विश्वास आहे सोबत !!     ..... रावांच्या जीवनात येताना , साऱ्यांचा आशीर्वाद घेईन सोबत !! ८. अक्षता पडल्या डोक्यावर, साक्ष आहे त्या अग्नीची !!     ..... रावांच्या सोबत आता, सुरुवात झाली संसाराची!!! ९. प्रत्येक पाऊल पुढे टाकतान...

अशी ही स्री || स्त्रीत्व || Marathi Lekh ||

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता। या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥ या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥ ज्या सरस्वतिचे, ज्या विद्येच्या देवीचे आपण वंदन करतो ती देवी सरस्वती एक स्त्री रूपच आहे आणि तिला वंदन करताना स्त्री या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे हे कळल्या शिवाय राहणार नाही. समाज घडला आणि घडत गेला तो  समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासा मधूनच. पुरातन ग्रंथात, कथेतून महिलांचे या समाजातील महत्त्व किती आहे हे वारंवार सांगण्यात आले. आपल्या कर्तृत्वाने महिलांनी ते सिद्ध ही करून दाखवले. आणि अशाच प्रकारे घडत गेला तो समाज , एक परिपूर्ण समाज, ज्या मध्ये स्त्री ही फक्त चूल आणि मूूल करणारीच नाही तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी झाली, आणि हेच सशक्त समाजाचे लक्षण आहे.   अनिष्ट रुढी आणि परंपरा यात जखडून बसलेल्या आपल्या स्त्रीला त्यातून बाहेर येण्यास वेळ नक्कीच लागला, पण जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने स्वतःला  सिद्ध केले. त्या काळात सुद्धा कित्येक स्त्रिया अशा होऊन गेल्या ...

संवाद || मराठी कविता || मनातल्या कविता ||

हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !!  कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओळखीची ती वाट आपली!! पण, त्या वाटेवरती आता भेटच होत नाही !! कारण , हल्ली तू आणि मी सोबत असूनही सोबत नाहीत !! तो आपुला क्षण, सांगतो खूप काही! आता पुन्हा तो आठवांचा पाऊस नाही !! बरसत आहेत कित्येक सरी त्या !! पण ती ओल कुठेच दिसत नाही !! तुलाही हे कळतंय, मलाही हे कळतंय !! पण मनापर्यंत पोहचतच नाही!! कुठे काय बिनसले आहे !! दोघांनाही आता कळत नाही !! शब्दांची गरज आहे या नात्यात !! पण नजरेने बोलणं थांबवलं ही नाही !! शोधलं खूप मी तुला , शोधलं तू खूप मला !! पण शोधुनही आपण सापडलो नाहीत !! विसरून जाऊ आपण अनोळखी जगात !! जिथे आपले कोणीच नाही !! आहे वेळ अजूनही या नात्यात !! जिथे आपल्या शिवाय कोणीच नाही !! फेकून द्यावी मनातली जळमटे!! ज्याचा काहीच उपयोग नाही !! कारण, तुझ्यात नी माझ्यात !! यामुळे नातच टिकत नाही !!! ✍️© योगेश *ALL RIGHTS RESERVED*