मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्षणिक या फुलास || Marathi Motivational Kavita ||

क्षणिक यावे या जगात आपण, क्षणात सारे सोडून जावे !! फुलास कोणी पुसे न आता, क्षणिक बहरून कसे जगावे !! न पाहता वाट पुढची कोणती, क्षणाक्षणास गंध उधळीत जावे !! कोणी ठेविले मस्तकी उगाच अन, कोणी पायी त्यास तुडवून जावे !! कधी प्रेमाचे बंध जोडून येता, त्यासवे प्रणयात हरवून जावे !! कधी मग अखेरच्या प्रवासातही, निर्जीव देहाचे सोबती व्हावे !! कोणी बोलता मनातले खूप काही, आठवणीत त्याच्या चुरगळून जावे !! फूलास न मग पुसले कोणी, वेदनेतही सुगंध कसे देत रहावे !! अखेरच्या क्षणात राहिले जरी काही, आयुष्याशी कोणते वैर नसावे !! सुकल्या पाकळ्यावरती मग तेव्हा, आपल्या जाण्याचे ओझे नसावे !! राहता राहिले इथे न काही, क्षणाक्षणाला आयुष्य जगत रहावे !! फुलास विचारून बघ तु एकदा, क्षणिक बहरून कसे जगावे !! ✍️योगेश खजानदार

नववर्षाच्या उंबरठ्यावर || NEW YEAR || Marathi Lekh ||

पाहता पाहता २०१८ वर्ष संपत आले. दिवस सरत जातात मग त्यात नवीन ते काय, असेही वाटू लागले. पण येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी गतवर्षीच्या काही गोष्टी सोबत घेऊनच या नवर्षात पदार्पण करावं लागत हेही सांगु लागले. नववर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे एवढेच जर असते, तर त्याचे एवढे कुतूहल वाटले नसते. पण येत्या वर्षात सोबत कित्येक नवनवीन गोष्टी येतात त्याच कुतूहल असतं. खरतर आयुष्य जगताना आपण विसरून जातो काळ, वेळ आणि बरंचं काही. पण हे लक्षात येतं ते या नववर्षाच्या पूर्वसंध्येला. म्हटलं तर विशेष अस काही घडत नाही. सरत्या वर्षाला निरोप देण्यातही काही अर्थ नाही असही काही लोक म्हणतील, मग येत्या वर्षाच ते कौतुक काय ?? होना !! पण असो, शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. येत्या वर्षाचा फक्त रात्रीच्या मद्यधुंद पार्टी करण्यासाठीच उपयोग आहे असाही समज चुकीचा ठरतो. गतवर्षीच्या मध्यरात्री जागून पार्टी करणे  हा आपणच नववर्ष साजरे करण्याचा केलेला विकृतपणा आहे. पण यापलीकडे जाऊन या नववर्षाच्या स्वागता करिता काही विचारही आपण करायला हवे असे वाटते. गतवर्षीच्या तुलनेत येत्या वर्षाचा संकल्प तेवढाच चांगला असावा हीच अपेक्ष...

सांग सांग सखे जराशी || मनातल्या कविता ||

सांग सांग गार वारा, उगाच तुला छळतो का ?? रित्या रित्या तुझ्या मिठीस, माझी आठवण देतो का ?? बघ बघ ते अभाळ, तुझ्यासाठी बरसेल का ?? माझ्या आठवणींचा पाऊस जरा, तुझ्यासाठी आणेल का ?? नाही नाही म्हणता म्हणता, ती वाट तुझ बोलेल का ?? माझ्या गावास येण्यासाठी, सोबत तुझी करेल का ?? थांब थांब सखे जराशी, काही तरी विसरतेस का ?? प्रेम आहे तुझे माझ्यावर, खरचं तू म्हणतेस का ?? खरं खरं सांगता सांगता, हलकेच तू हसतेस का ?? मनातल्या भावना कळताच, अलगद तू लाजतेस का ?? कुठे कुठे पाहता आता, ते गंध सर्वत्र पसरले का ?? तुझ्या मनात प्रेमाचे हे फुलं, खरंच बहरले का ?? नको नको वाटते जरी ते, हृदय ऐकत नाही का ?? तुझ्या मनात नाव माझे , सतत लिहिले जाते का ?? एका एका क्षणात आता, मीच मी उरलो का ?? माझ्याविना क्षणांची तुझ,  भिती आता वाटते का ?? सांग सांग गार वारा , उगाच तुला छळतो का  ?? ✍️©योगेश खजानदार

अल्लड ते हसू ..!!😊

अल्लड ते तुझे हसू मला नव्याने पुन्हा भेटले कधी खूप बोलले माझ्यासवे कधी अबोल राहीले बावरले ते क्षणभर जरा नी ओठांवरती जणू विरले अल्लड ते हसू मला का पुन्हा तुझ्यात हरवून ब...

सांग सखे ...🤔

मनातले सखे कितीदा सांगुनी प्रेम तुझ माझे कळलेच का नाही हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही उरल्या या मिठीत माझ्या प्रेमाचा जणू गंध तुझ्या श्...

नेतृत्व कसे असावे..✍️

     तुमचे विचार, तुमची वागण्याची पद्धत हे तुमचं नेतृत्व कोण करत यावर ठरतं, आणि त्यामुळेच आयुष्यात प्रत्येकाला योग्य नेतृत्वाची गरज असते याला काहीच दुमत नाही. तुमच्या व...

उध्वस्त वादळात..✍️

न उरल्या कोणत्या भावना शेवट असाच होणार होता वादळास मार्ग तो कोणता त्यास विरोध कोणता होता राहिल्या तुटक्या काहीं आठवणी त्यास आधार काहीच नव्हता पापण्यात साठवून ठेवण्य...

हो मला बदलायच आहे ...✍️

   आयुष्य जगताना खरंतर खूप काही गोष्टी आपल्याकडून अनवधानाने होऊन जातात. मग त्या गोष्टीचा पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही. आपण कधी कधी असे वागून जातो की आ...