भाग १४ भेट पाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण आणि अभ्यास सोडून सगळं आयुष्य जगण्याची ओढ, यातून तो पुन्हा गर्ततेत अडकला. पहिल्या सेमीस्टर मध्ये तो नापास झाला. बाबांनी आईनी त्याला याबद्दल खूप सुनावलं. पण त्याच्यावर त्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. आयुष्य आपलं अनमोल आहे हे तो विसरून गेला. कॉलेजच्या आवारात टवाळक्या करण्यात तो हरवून गेला. पण दोष मात्र आपल्या हरण्याचे दुसऱ्यांवर टाकत गेला. "इतकं सगळं करूनही, मी अजूनही अयशस्वी का होत आहे माझंच मला कळत नाहीये !! आई बाबांचा तर विश्वासाचं माझ्यावरून उडून गेलाय. कोणत्या तोंडाने त्यांना बोलावं तेच कळत नाहीये. बारावीला झालेली चूक पुन्ह...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!