मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शर्यत || कथा भाग ४ || Sharyat katha bhag 4 ||

कथा भाग ४ सखा कित्येक दिवस दुकानाकडे गेलाच नाही. त्याच्या मनात सारखं जाण्याचा विचार येतही होता पण त्याला काय करावं सुचतच नव्हतं. पुन्हा त्या शिरपाने मारलं तर ?? या भीतीने तो घरातच थांबला. या वयात काही झालं तर निस्तारायला पैसे तरी आहेत का ?? या विचारांनी तो पुरता वेडावून गेला होता. डोक्यावरची जखम आता हळूहळू बरी होत आली होती.  सांजवेळ होत आली आणि शांता समोरून येताना त्याला दिसली. तिला पाहून तो जागेवरून उठला तिच्या डोक्यावर भलीमोठी लाकडाची मोळी होती. ती डोक्यावरून उतरवत शांता बोलू लागली. "आज दिवसभर भटकले !! पण कुठ पण काम मिळालं नाही मला!! शेवटी पलिकडच्या गावात झाड तोडायच होत,  ते केलं !! कसे बसे पाच रुपये दिलेत त्यांनी !! " शांता खाली बसत म्हणाली. "भूक लागली असलं ना ??" सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला. शांता पाणी घटाघटा प्याली. "पोटात भुकेन कावळे वरडायलेत !!" शांता पाण्याचा तांब्या खाली ठेवत म्हणाली. "चल मग जेवूयात !! " सखा तिला उठवत म्हणाला. "जेवण ??" सखा फक्त तिच्याकडे पाहून हसला.  "तुम्ही केलंत ??...

शर्यत || कथा भाग ३ || Sharyat Marathi Story ||

 कथा भाग ३ सखा धावत धावत पुन्हा सुतारवाडीला आला. दुकानात आतमध्ये जाणार तेवढ्यात त्याला जोरजोरात कोणीतरी बोलण्याचा आवाज आला. आप्पांना कोणीतरी भांडत होत हे कळायला त्याला वेळ लागला नाही. तो दरवाजातून आत डोकावून पाहू लागला. तेवढ्यात कोणीतरी रागात बाहेर येताना त्याला दिसलं. मागे आप्पाही येत होते.आप्पा दरवाजासमोर येत म्हणाले. "शिरपा एवढा माज चांगला नाही !!" "तर तर !! एका मिनीटात मला कामावरून काढलं !! आन आता माज माझाच दिसायला होय !!" शिरपा जोरात म्हणाला. एव्हाना सख्याच्या लक्षात आल होत काय प्रकार आहे तो. तेवढ्यात आप्पांच लक्ष सखाकडे जात. त्याला बघून ते म्हणाले. "आलास का डबा देऊन ??" "होय !!" सखा हळू आवाजात म्हणाला. "जा !! आत दुसऱ्या कामात मदत करू लाग !! " आप्पा दरवाज्याकडे हात करत म्हणाले. तेवढ्यात शिरपा मोठ्याने म्हणाला. "हे म्हातारं आहे काय साहेबांना डबा द्यायला जाणार !!" "शिरपा !! तोंड सांभाळून बोल !! आन तुला कामावरून काढल कोण म्हणतंय !! फक्तं हे काम नाही !! दुसरं करायचं !!"  "पण गेली कित्येक वर्ष मीच हे काम करत आलो...

शर्यत || कथा भाग २ ||Marathi katha ||

कथा भाग २ आप्पा लगबगीने साहेबांच्या घरी पोहचले. आज नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला होता त्यांना. साहेबांचं घर म्हणजे जणू एक महालच होता. आप्पा मुख्य दरवाज्यातून आत गेले. समोर साहेब नुकतेच जेवण करून हात धुवायला गेले होते. आप्पांना समोर पाहून ते हातातील ताब्या बाजूला ठेवत म्हणाले. "काय आप्पा !! कधी नाही ते आज उशीर झाला यायला!!" आप्पा क्षणभर काहीच बोलले नाही. हातातील हिशोबच वही समोर करत म्हणाले. "आज थोडा वेळच झाला दुकान बंद करायला !! " "बरं बरं !!" साहेब आप्पांच्या हातातील हिशोबाची वही घेत म्हणाले.  दोघांमध्ये कित्येक वेळ दुकानाच्या हिशोबा विषयी चर्चा झाली आणि मध्येच साहेबांनी आप्पांना विचारलं. "आप्पा !! दुपारी डबा कोणाच्या हातून पाठवला होता ??" "तुम्हाला डबा मिळाला ??" "हो तर !! अगदी वेळेत दिला आणून !!" "नवीनच होता माणूस !! सखा नाव आहे त्याच !!"  "सखा !! बरं बरं !! पुन्हा बोलावून घ्या त्याला !!" " हो जी !! उद्या येतो म्हणाला !! अजून पाच रुपये द्यायचे राहिलेत त्याचे !!" "द्यायचे राहिलेत ?? का बरं ??...

सखी सोबती ती || Marathi Virah Kavita ||

बरसून जाण्या, पुन्हा आठवात यावी !! सखी सोबती ती, सांज होऊन यावी !! कुठे अलगदशी , झुळूक होऊन जावी!! कुठे हुरहूर ती, मनास लावून जावी!! साऱ्या नभात ती, रंग जणू उधळावी !! साऱ्या आयुष्याची, साथ ती व्हावी !! सावल्यात तेव्हा, कूठे ती शोधावी !! सावली होऊन , हृदयात ती राहावी !! कसे सांगावे, कशी ती लिहावी !! मनातल्या तिला, गोष्ट एक सांगावी !! क्षणात येता, नजरेत त्या ठेवावी !! क्षणात जाता, नजरेतून ओघळावी!! सखी ती हसता, ती  रात्रही हसावी !! सखी ती बोलता , ती रात्रही बोलावी !! हळूवार ती , गंध होऊन पसरावी !! अलगद ती, पुन्हा आठवात यावी !! सखी सोबती ती, सांज होऊन यावी !! ✍️योगेश खजानदार

शर्यत || कथा भाग १ || MARATHI STORIES || KATHA ||

टीप : "  शर्यत "  ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथा भाग १ " जमिनीवर पडलेल्या प्रत्येक अन्नाचा कण मला डोंगरा एवढा मोठा का वाटतो ?? आणि त्याला उचलण्यासाठी माझी ती एवढी धडपड का असेल ??  पण सगळं वायाच गेलं !! मी इकड जमिनीवर पडलेल्या भाकऱ्या गोळा करत बसलो आणि तिकडं त्या माझ्यासारख्याच भुकेजल्या कुत्र्यांनी ते ओढून नेलं !! जाऊदे त्यांच्याच नशिबात  असलं ते म्हणून त्यांना मिळालं !! शेवटी नशिबाच्या पुढं कोणाचं चालतंय का ?? " सखा आपल्याच विचारांच्या तंद्रीत रस्त्यावरून चालत चालला होता.  "शांतेला काम मिळालं असलं !! ती आणलं काहीतरी खायला संध्याकाळी !! आता तो पर्यंत पोटाची भूक अशीच मारावी लागणार मला !! " सखा पोटाला हाताने दाबत विचारातून बाहेर येतो.  समोर एक इसम जोरजोरात ओरडत होता. आपल्या हाताखालच्या लोकांना काम लवकर करा म्हणून ताकीद देत होता. सखा एकटक त्याच्याकडे पाहत राहिला. तो इ...

चार पानांचं आयुष्य || Marathi Sundar kavita ||

चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !! प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !! कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !! प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !! पहिल्या पानावरती कुतूहलाने, नवं रूप पहायचं !! बालपण हे सुंदर, त्याला मनभर बोलायचं !! खेळायच , पडायचं , खूप काही शिकायचं !! सुरुवातीच्या या पानात, जग सार लिहायचं !! नकळत केव्हा मग, दुसरं पान वाचायचं !! तारुण्याच्या आरशात, स्वतःला तासनतास पाहायचं !! पहिलं प्रेम, पहिली कमाई, सारं जग मुठीत घ्यायच !! कुठे यश , कूठे अपयश , सतत धडपडत राहायचं !! येता येता मग ते, पान तिसरं बघायचं !! स्वप्न सत्यात उतरवताना, घर ते बांधायचं !! आई बाबा, बायको मुल, साऱ्यांना कवेत घ्यायचं !! आपलं सुख बाजूला ठेवून, साऱ्यांना सुखी करायचं !! मग येत चौथ पान, जिथे आयुष्य पुन्हा जगायचं !! उतरत्या वयात स्वतःला, पुन्हा तरूण करायचं !! नातवाच्या हाताला धरून, साऱ्या घरभर फिरायचं !! पिकलेल्या केसांकडे पाहत मग , आठवात हरवून जायचं !!! चार पानांचं आयुष्य हे!! मनसोक्त जगायचं !! प्रत्येक श्वास घेताना, नवं काही लिहायचं !! ✍️ योगेश खजानदार

शोधाशोध || मराठी कविता || Marathi Kavita ||

सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची?? हरवलेल्या वाटा!! आणि ओढ त्या कोणाची!! बोल तू खरे !! रुखरुख आहे ना मनाची ?? आठवांचा गंध!! आणि भेट ती पावसाची!! डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ?? ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची!! एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ?? जड पावले!! आणि ओळख ती सावल्यांची !! वादळात भेट व्हावी!! होईल का क्षणांची ?? उद्ध्वस्त घरात, सोय होईल का निवाऱ्याची!! इथेच पुन्हा यावे!! हीच ओळख नात्यांची?? संवाद आणि वाद !! हीच उत्तरे प्रश्नांची !! सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची?? ✍️ योगेश खजानदार

क्षण सारें असेच || Marathi Kavita || kshan Sare asech ||

क्षण सारें असेच, का निघून जातात?? वर्षा मागून वर्ष, मागे पडत जातात !! कुठे गोड आठवांचा, गंध ठेवून जातात , कूठे उगा अश्रूंचा, बांध भरून जातात !! क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !! रुसव्यात त्याची समजूत, जणु काढत रहातात !! एकांतात माझ्याशी उगा, का भांडत रहातात?? क्षण सारें असेच, जीव लावून जातात !! परतून येण्याचे का?  वचन देऊन जातात!! मागे वळून पाहता , दूर का भासतात ?? डोळे बंद करता, जवळ का येतात ?? क्षण सारें असेच , अनोळखी होऊन जातात !! पाहता पाहता का?? अबोल होऊन जातात !! हृदयाच्या कोपऱ्यात का? घर करून राहतात !!  आपलेच चेहरे विसरून, परक्यास आठवतं राहतात !! क्षण सारें असेच, शब्द होऊन जातात !! लिहून घेतल्या कागदात , मन मोकळं राहतात !! कधी प्रेमाची आठवण, जणु करत रहातात !!! शेवटच्या ओळीत का ?? सारं बोलून जातात !! क्षण सारें असेच,  पाऊस होऊन जातात !! भेफान बरसताना का ?? स्वतःस विसरून जातात !! कूठे ओल कायमची, मनात ठेवून जातात !! कूठे नुसता आभास, उगाच देऊन जातात !! क्षण सारें असेच , नदी होऊन येतात !! कूठे वाट डोंगराची, कूठे उंचावरून कोसळतात !!...